Awaj India
Register

जाहिरात

 

व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात

schedule25 Apr 25 person by visibility 352 categoryउद्योग

युवराज राजीगरे -
गोवा;
रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर केल्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. त्यात कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे. याच रोगाला आपल्या मित्राची आई बळी पडली. हे सारं रासायनिक खतांच्या वापरामुळे होतं आहे. हे समजताच डॉ शत्रुघ्न जाधव यांनी निश्चिय केला. आपण ऑरगॅनिक खतांची निर्मिती करायची, यातूनचं व्यंकटेश हॅपी लाईफ कंपनीचा उदय झाला‌ 
         व्ही.हॅपी लाईफ कंपनीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या वेळी डॉ शत्रुघ्न जाधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शेतकरी बांधवांना ऑरगॅनिक खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी मारुती साठे,युवराज राजीगरे, मोहन कांबळे, स्वप्नील माने,एम बी कांबळे, धनाजी चौगले, उत्तम पाटील, रणजीत गळदगे, सर्जेराव पाटील ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes