Awaj India
Register
Breaking : bolt
ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड​निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली

जाहिरात

 

बहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडे

schedule22 Jan 26 person by visibility 623 categoryसामाजिक

कोल्हापूर | प्रतिनिधी
बहुजन समाजाच्या हक्कांसाठी पत्रकारितेला चळवळीचे स्वरूप देत गेल्या चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रा. अंकुश गोविंद वाकडे (रा. यवतमाळ) यांनी मूकनायक पुरस्कारासाठी आपल्या नावाचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या ते दैनिक **‘पब्लिक पोस्ट’**चे संपादक म्हणून कार्यरत असून यापूर्वी दैनिक पुण्यनगरी, पुढारी, नवभारत, भास्कर, टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई चौफेर आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी व संपादकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू केवळ बातम्या न राहता बहुजन समाजाचे प्रश्न, हक्क व प्रबोधन हा राहिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या विचारांचा प्रचार–प्रसार व्हावा यासाठी प्रा. वाकडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक विहारात प्रत्यक्ष भेटी देत जनजागृती केली. पत्रकारितेतील सामाजिक भान, बाबासाहेबांचे जीवन–विचार व संघर्ष यांवर त्यांनी सातत्याने प्रबोधनात्मक कार्य केले आहे.
पत्रकारितेबरोबरच त्यांचे सामाजिक योगदानही उल्लेखनीय आहे. पारधी व कोलाम समाजातील दुर्लक्षित मुलींच्या शिक्षणासाठी १८ मुली दत्तक घेऊन शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यापैकी ११ मुली आज नोकरीत कार्यरत असून उर्वरित मुलींच्या शिक्षणासाठी मदत सुरू आहे. तसेच आई मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून कोलाम समाजातील २८३ कुमारी माता असलेल्या मुलींना शैक्षणिक, सामाजिक व मानसिक आधार देण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. समता पर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
“माझा जीवनप्रवास, कार्य व योगदान हाच माझा खरा बायोडाटा आहे,” असे नमूद करत, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी व पत्रकारितेच्या मूल्यांसाठी समर्पित कार्याची दखल मूकनायक पुरस्कारासाठी घेतली जावी, अशी अपेक्षा प्रा. अंकुश गोविंद वाकडे यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes