Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

जाहिरात

 

वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

schedule12 Jun 25 person by visibility 636 categoryगुन्हे

कोल्हापुर; (प्रशांत चुयेकर)
वाडीपीर (ता. करवीर ) येथील जलजीवन मिशनची योजना काही दिवस बंद आहे. सातत्याने पाईप लाईन फुटत असल्याने गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. स्वच्छ आणि मुबलक पाण्याच्या नावाखाली या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. वाडीपीर येथील जल जीवन मिशन कोणी खाल्ले जास्त कमिशन असा प्रश्नही ग्रामस्थ विचारत आहेत.
 
ग्रामीण भागातील कुटुंबांना 55 लिटर पाणी देण्यात यावे. असा उद्देश या योजनेचा आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली. २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणी (Functional Household Tap Connection - FHTC) प्रत्येक ग्रामीण घरात देणे असा उद्देशीय योजनेचा होता.
वाडीपीर या गावात 2025 पर्यंत पूर्ण काम केलेली नाही. महिन्यातून चार वेळा ही योजना बंद असते. पाणी आले तर अस्वच्छ आणि गढूळ असते. यामुळे गावातील नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत आहे. काही महिलांनी पाण्यामध्ये अळ्या असल्याचा आरोप केला. 
ज्योती दिलीप दिंडे सांगतात,पिण्याचे पाणी विकत आणावे लागते. पाणी गढूळ असल्यामुळे लोक आजारी पडतात. आजारणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे. गावात शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. काही महिलांनी डेंगूचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले तर पाणी फिल्टर होत नाही असेही सांगितले.
येथील उज्वला बाबासाहेब धोत्रे म्हणाल्या, अस्वच्छ पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी येत नाही. येथील नागरिक संजय पोवार म्हणाले,ही योजना पूर्णत्वास झाली नसून याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली आहे. दोन महिने याचा पाठपुरावा आम्ही करत आहे. अद्याप आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. विश्वास दिंडे म्हणाले, अशूद्ध पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.फिल्टरचे मशीन बंद असून पाणी फिल्टर केले जात नाही.
 पाडळी (ता. करवीर ) येथून सात किलोमीटरवर असणारे वाडीपीर या ठिकाणी ही जल जीवन मिशन योजना सात किलोमीटर पेक्षा अधिक अंतराने घेतलेले आहे. पाईपलाईनला वळण अधिक असल्याकारणाने पाईपलाईन गळती होत आहे.भविष्यात गळतीचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणार नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले.
क्रमशः
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes